राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या सूचक विधानामुळे नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, खासदार, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतरांनर उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचे दिसते आहे.
अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा सुरु होत्या. आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या विधानानंतर नव्या चर्चांना उधाण आले आहे. शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळेस त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.
पुण्यात मनसेच्या “गणपती आमचा किंमत तुमची २०२२” या आयेजित उपक्रमाचे त्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी “साद घातली तर येऊ देत” हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
Sharad Pawar :शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले|मी जबाबदारी घेणार नाही
CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचले|कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचे
आज होणार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय|मुंबईत आज होणार बैठक